नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर शिवसेनेने घेतली हरकत.



उरण दि २5 (विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अ कोकण विभागीय पुरवणी क्रमांक RNI NO. MAHBIL/२००९/३५५७४, दिनांक १४/०७/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर आदेशानुसार उरण पंचायत समिती येथे झालेल्या बैठकीमध्ये नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचना नव्याने करण्यात यावी, त्यामध्ये २०१७ च्या निवडणुकी पूर्वी नवघर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये सोनारी, करळ, सावरखार अशी तीन गावे आताच्या प्रभाग रचनेत वगळण्यात आलेली आहेत. 

ती पुन्हा एकदा नवघर जिल्हा परिषदेमध्ये घेण्यात यावी.त्याचबरोबर काळा धोंडा हे चाणजे ग्रामपंचयातीमध्ये समाविष्ठ असल्यामुळे तो भाग चाणजे जिल्हा परिषद प्रभागात घेण्यात यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे पत्रव्यवहारद्वारे केली आहे.भारतीय लोकसंख्येची जनगणना मागील बारा वर्षे झाली नसल्याकारणाने उरण मतदार संघातील जिल्हा परिषद प्रभाग रचनेमध्ये लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. 

तरी नवघर जिल्हा परिषदेत पारंपारिक असलेले प्रभागातील गावे न वगळता नव्याने २०१७ च्या निवडणुकीत अगोदर असलेले प्रभाग रचना तसेच ठेवण्यात यावी अशी मागणी तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून व हरकत घेऊन जिल्हाप्रमुख अतुल भगत यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top