नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

उरण तालुक्यात जमीन खरेदी व्यवहारांमध्ये दस्त नोंद घालण्यासाठी खोट्या शेतकरी दाखल्यांचा वापर.






4k News

उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )तिसरी महामुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील उरण, पेण आणि पनवेल या ९५ गावांच्या जमिनीवर सध्या गब्बर लोकांचा डोळा असताना या परिसरामध्ये  एक गुंठा एक प्लॉट अशा जाहिरातींना बळी पडून पर राज्यातील आणि काही बांगलादेशी नागरिकांचे उरण पूर्व विभागामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचे व्यवहार सुरू आहेत . परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उरण तालुका अध्यक्ष ॲड.  सत्यवान भगत यांनी मागितलेल्या माहितीनुसार बऱ्याच खरेदी झालेल्या दस्त नोंदणीमध्ये राजस्थान राज्यातील  वाळवंट भागातील भूमी प्रमाणपत्र एडिटिंग करून  खोटे शेतकरी असल्याचे दाखले जोडून नोंद केल्या जात आहेत. 

परंतु याकडे महसूल विभागाचा सुद्धा कानाडोळा असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये होत आहे. नोंद करण्यासाठी  तलाठी,सर्कल  मोठ्या प्रमाणात रसद घेत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. सर्वसामान्य जनतेला जमीन घ्यायचे असेल तर त्याला शेतकरी असल्याचा दाखला लागतो. मग परराज्यातील येणाऱ्यांवर   एवढी मेहरबानी का केली. असा सवाल सत्यवान भगत यांनी उपस्थित केला आहे. 

या संदर्भात  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्ट मंडळातील मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर, उरण तालुका अध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांनी दुय्यम निबंधक यांच्याशी चर्चा करून त्यांनी मिळवलेल्या माहितीच्या अधिकाऱ्याखाली माहितीचे प्रत कसे खोटे दाखले आहेत हे समोरासमोर दाखवून दिले.जमिनी खरेदी विक्री संदर्भात होणाऱ्या चुकीच्या गोष्टी तातडीने थांबवण्यात याव्यात. अन्यथा आम्हाला हायकोर्टामध्ये जनहितासाठी  याचिका दाखल करावी लागेल.असा इशारा सत्यवान भगत यांनी प्रशासनाला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top