नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

संन्यस्त खड्ग’ नाटकाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा इशारा; पनवेलमध्ये प्रयोग थांबवण्याची मागणी

4k समाचार दि. 23

पनवेल/रायगड (प्रतिनिधी) – वि. दा. सावरकर लिखित ‘संन्यस्त खड्ग’ या नाटकाच्या प्रयोगाविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा तीव्र भूमिका घेतली आहे. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके सभागृहात हा प्रयोग होणार आहे. तथागत गौतम बुद्ध यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप करीत या नाटकाला विरोध दर्शविण्यात आला आहे.



यापूर्वी पुणे व मुंबईत आंदोलनानंतर हे प्रयोग बंद करण्यात आले होते. त्याच धर्तीवर रायगड जिल्ह्यातही हा प्रयोग होऊ देणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
२२ सप्टेंबर रोजी पनवेल महानगराध्यक्ष आनंद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त वैभव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त ढोले व ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाटकाचा प्रयोग रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. अन्यथा, प्रयोगस्थळी आंदोलन करून तो उधळून लावू असा इशारा देण्यात आला.



या प्रसंगी महासचिव अविनाश आडांगळे, संतोष मुजमूले, उपाध्यक्ष छाया शिरसाठ, कविता सोनावणे, लता सोनावणे, नवीन पनवेल शहराध्यक्ष शिवाजी साळवे, महासचिव किरण सोनावणे, खारघर शहराध्यक्ष राहुल वानखडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले की, “छत्रपती शिवरायांची पवित्र भूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतिभूमी असलेल्या रायगड जिल्ह्यात बौद्धांचा अपमान करणारे प्रयोग कदापि सहन केले जाणार नाहीत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top