नवीन बातम्या
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार
कळंबोली बस स्थानकातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे महिलेची सोन्याची बॅग परत

*जिवाची पर्वा न करता बीट मार्शल यानी पाण्यात   बुडत  असलेल्या महिलेचा जीव वाचवला*
रयत शिक्षण संस्थेला ३.६२ कोटींची देणगी; लोकनेते रामशेठ ठाकूर, सौ. शकुंतला ठाकूर, परेश ठाकूर यांचा कर्मवीर भूमीत हृद्य गौरव 
सर्वसामान्य ग्रामस्थांना देखील करता येणार थाटात विवाह सोहळा 
थ्री स्टार राज रिसॉर्ट यांचा स्तुत्य पुढाकार
पनवेल विधानसभा युवासेना संपर्क प्रमुख पदी ॲड. अभिनय चंद्रशेखर सोमण यांची नियुक्तीपनवेल विधानसभा युवासेना संपर्क प्रमुख पदी ॲड. अभिनय चंद्रशेखर सोमण यांची नियुक्ती
पनवेलसाठी सिडकोने पाणी उपलब्ध करून द्यावे
खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश
रायगड जिल्ह्यातील शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील यांनी केला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार

कामोठे रहिवासी सामाजिक संस्थेचा माणुसकीचा उपक्रम बीडमधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचा मोठा संच रवाना!


4k समाचार दि. 5
कामोठे : प्रतिनिधी
मानवतेचा हात पुढे करत समाजातील गरजूंसाठी सदैव तत्पर असलेली कामोठे रहिवासी सामाजिक संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. पोपट दादा आवारे यांच्या प्रेरणेतून आणि कामोठेतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संस्था यांच्या सहकार्याने बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा मोठा संच रवाना करण्यात आला. 



गेल्या काही दिवसांत बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावे जलमय झाली, घरे उद्ध्वस्त झाली आणि जनजीवन विस्कळीत झाले. या आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात देण्याचा निर्धार करत पोपट दादा आवारे यांनी मदत संकलन मोहिमेचा शुभारंभ केला.
कामोठेतील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत धान्य, कपडे, ब्लँकेट, औषधे, सुकामेवा, बिस्किटे, पिण्याचे पाणी अशा जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणावर दिल्या.



📦 या वस्तूंचे नियोजनबद्ध पॅकिंग करून आज सकाळी बीड जिल्ह्यासाठी मदतवाहन रवाना करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, स्थानिक नागरिक, तसेच अनेक सामाजिक संस्था आणि स्वयंसेवक उपस्थित होते.
यावेळी श्री. पोपट दादा आवारे म्हणाले,
मानवतेचा धर्म मोठा आहे. आपल्या राज्यात कोणीही उपाशी राहू नये, थंडीने किंवा संकटाने थरथरू नये — हीच आमची भावना आहे. या उपक्रमात कामोठेकरांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि एकोप्याची भावना अभिमानास्पद आहे.”
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, कामोठे रहिवासी सामाजिक संस्था पुन्हा एकदा समाजकारणाच्या माध्यमातून माणुसकीची खरी ओळख ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top