नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

कामोठे रहिवासी सामाजिक संस्थेचा माणुसकीचा उपक्रम बीडमधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचा मोठा संच रवाना!


4k समाचार दि. 5
कामोठे : प्रतिनिधी
मानवतेचा हात पुढे करत समाजातील गरजूंसाठी सदैव तत्पर असलेली कामोठे रहिवासी सामाजिक संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. पोपट दादा आवारे यांच्या प्रेरणेतून आणि कामोठेतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संस्था यांच्या सहकार्याने बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा मोठा संच रवाना करण्यात आला. 



गेल्या काही दिवसांत बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावे जलमय झाली, घरे उद्ध्वस्त झाली आणि जनजीवन विस्कळीत झाले. या आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात देण्याचा निर्धार करत पोपट दादा आवारे यांनी मदत संकलन मोहिमेचा शुभारंभ केला.
कामोठेतील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत धान्य, कपडे, ब्लँकेट, औषधे, सुकामेवा, बिस्किटे, पिण्याचे पाणी अशा जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणावर दिल्या.



📦 या वस्तूंचे नियोजनबद्ध पॅकिंग करून आज सकाळी बीड जिल्ह्यासाठी मदतवाहन रवाना करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, स्थानिक नागरिक, तसेच अनेक सामाजिक संस्था आणि स्वयंसेवक उपस्थित होते.
यावेळी श्री. पोपट दादा आवारे म्हणाले,
मानवतेचा धर्म मोठा आहे. आपल्या राज्यात कोणीही उपाशी राहू नये, थंडीने किंवा संकटाने थरथरू नये — हीच आमची भावना आहे. या उपक्रमात कामोठेकरांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि एकोप्याची भावना अभिमानास्पद आहे.”
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, कामोठे रहिवासी सामाजिक संस्था पुन्हा एकदा समाजकारणाच्या माध्यमातून माणुसकीची खरी ओळख ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top