नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

*करंजाडे शहरात शिवसेनेच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली💐!*



आज दिनांक ११ मे २०२५ रोजी, करंजाडे शहरामध्ये शिवसेना करंजाडे शहर विभागातर्फे देशासाठी शहीद झालेल्या जवानांना अत्यंत श्रद्धेने आणि कृतज्ञतेने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.



या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना करंजाडेच्या वतीने करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक सेक्टर ५, करंजाडे,  या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. विनोदजी साबळे साहेब, उरण विधानसभा सचिव श्री. हितेश नाईक, तालुका संपर्क प्रमुख बाळाराम नाईक साहेब ,करंजाडे विभागप्रमुख श्री. नाथाभाई भरवाड, शहर संपर्क प्रमुख श्री. चंद्रकांत गुजर, शहरप्रमुख श्री.मिरेंद्र शहारे, शहर संघटक श्री स्वप्नील मोरे, महिला शहरप्रमुख सौ.अंजु सिंह, पंचायत समिती प्रमुख श्री. बाळासाहेब अवारी, 

उपशहरप्रमुख श्री. वसंत सोनवणे, श्री. प्रल्हाद कुंभार, श्री. अक्षय टिके, अजित कदम, शहर सचिव श्री. सचिन कदम, शाखाप्रमुख श्री. दिनेश धामनस्कर, श्री. राजाभाऊ नलावडे, श्री. नितीन कुंभार, श्री. ज्वलासिंह देशमुख, श्री. जयेश पटेल, श्री. गणेश वालझाडे, श्री. जयराज गणिगा, श्री. विश्वनाथ शेट्टी, श्री. संचित मोरे, श्री. संदीप पारठे, श्री. तुलसी गौतम, श्री. लीलाधर म्हात्रे, श्री. अरुण कंबीरे, कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



यावेळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटांचे मौन पाळून शहीदांच्या बलिदानास अभिवादन केले. उपास्थितांनी हातात तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’ आणि ‘जय जवान, जय हिंद’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमवून टाकला.


कार्यक्रमाच्या शेवटी ‘वंदे मातरम्’च्या घोषात श्रद्धांजली समारंभ समाप्त झाला. या कार्यक्रमातून करंजाडे शहरातील नागरिकांनी देशप्रेमाची आणि शहीदांविषयी कृतज्ञतेची जाणीव प्रकट केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top