नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

प्रितम म्हात्रे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
“नुकसानग्रस्त घरांसाठी जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा मदतीचा हात”



उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून गेले काही दिवस रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. यादरम्यान पनवेल उरण परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. ज्यामुळे सामान्य नागरिकांसोबत ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा हवालदिल झाला होता. 


   दोन दिवसांपूर्वी मुसळधार वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे उरण मधील सारडे गावात काही घरांची वाताहात झाली. घर आणि शेतामध्ये पाणी घुसले, काही घरांचे कौल आणि पत्रे सुद्धा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडून गेले. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून काही ठिकाणी पाहणी करण्यात आली.


    शासनाकडून योग्य तो पाठपुरावा करून त्यांना सहकार्य मिळेलच परंतु आपणही समाजाचे काही देणं लागतो या भावनेतून प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक माणुसकीचा हात म्हणून नगरसेवक गणेश कडू, माजी सरपंच  जितेंद्र म्हात्रे, रामेश्वर आंग्रे,  मंगेश अपराज  यांनी दुर्घटनाग्रस्त भागातील घरांची पाहणी केली. दुर्घटनाग्रस्त रहिवासीयांची भेट घेऊन शासनाकडून योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

सामाजिक बांधिलकीतून जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून तातडीचे अर्थसहाय्य देऊन त्यांना मदत केली.यावेळी सारडे गावातील शेखर पाटील यांच्यासोबत ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top