नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

हिंदी सक्तीच्या निर्णयावर सरकारची माघार..


मुंबई: महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षणात हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मागे सरकताना, याआधी घेतलेले दोन्ही शासन निर्णय रद्द केल्याची घोषणा केली आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

फडणवीस म्हणाले, “हिंदी ऐच्छिक आहे. मराठी भाषा राज्यात अनिवार्य आहे. कोणीही भारतीय भाषा शिकू शकतो, पण कोणतीही भाषा सक्तीने लादली जाणार नाही.”

हा निर्णय ठाकरे गट आणि मनसे पक्षांनी ५ जुलैला मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर घेण्यात आला आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top