नवीन बातम्या
*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*
महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड
पहाटे वाहनांना आग
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार

मैत्री ग्रुप २००७ ने वीर वाजेकर महाविद्यालय परिसरात केली आंबा लागवड

4k समाचार
उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )मैत्री ग्रुप वीर वाजेकर महाविद्यालय २००४-२००७ च्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात “माझं महाविद्यालय , माझी भेट- माझं झाड” या संकल्पनेतून वृक्षारोपण केले. हा उपक्रम राबवताना ज्या सहकाऱ्यांचा वाढदिवस असेल त्याने किमान एक झाड लावावे असे नियोजन केले होते.
त्यानुसार महाविद्यालयाच्या परवानगीने मैत्री ग्रुपने हापूस, केशर, निलम, राजापुरी, रत्ना अशा विविध जातीची ३० आंबा कलमे आणून त्याची लागवड आज सुरू केली. 



याप्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी मैत्री ग्रुपच्या या उपक्रमाचे कौतुक केले. माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या संपर्कात राहिले पाहिजे. सर्वांच्या सहकार्याने महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास होत आहे. यात माजी विद्यार्थ्यांचे महत्वाचे योगदान मिळत असून ते या पुढेही मिळत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मैत्री ग्रुपच्या सदस्यांना परिसर भेट घडवत मियावाकी प्रकल्प तसेच इतर प्रकल्प उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मैत्री ग्रुपचे रुपेश पाटील यांनी माझं कॉलेज माझी भेट माझं झाड उपक्रमाची माहिती दिली. पर्यावरण समतोल राखण्यासाठी अधिकाधिक वृक्षारोपण आवश्यक असून आपण सर्वांनी त्यासाठी आग्रही असले पाहिजे.

महाविद्यालयाने हा उपक्रम राबवण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल महाविद्यालय प्रशासनाचे आभार मानले. या आंबा कलम लागवडीनंतर त्याची निगा संगोपन करण्याची जबाबदारी आमची आहे असे सांगताना प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच येथील विद्यार्थी देखील सहकार्य करतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच यापुढेही असे विविध कार्यक्रम ग्रुपकडून राबविण्यात येतील असे सांगितले .



यावेळी प्रा. गजानन चव्हाण  प्रा.  राम गोसावी, प्रा. डॉ अनिल पालवे प्रा. डॉ गुरमीत वाधवा यांच्यासह मैत्री ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. या उपक्रमासाठी मैत्री ग्रुपचे निलेश ठाकूर, हेमांगी पाटील, संदीप पाटील, चेतन ठाकूर, कमलाकर घरत, प्राजक्ता ठाकूर, निशा तांडेल, तन्वी घरत, जुलेखा ठाकूर, दीपिका ठाकूर, कामिनी ठाकूर, वंदना कडू, सुषमा पाटील, करुणा कोळी, दीपाली पाटील, वैजयंती कडू – तरल, दर्शन घरत, निलेश म्हात्रे, जगन पाटील, निता म्हात्रे, आशा पाटील, रजनी पाटील, समीर जोशी, समाधान जोशी, मनोहर डाकी, गणेश कोळी, मनमोहन कोळी, एड. योगेश म्हात्रे, सारिका पाटील आदीनी विशेष मेहनत घेतली. पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमासाठी झाडे दिली आणि लागवडीसाठी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top