नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

“आम्ही गुन्हेगार नाही… कामोठ्याच्या सामान्य नागरिकांची हाक!”सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून अवाजवी दंडाविरोधात नागरिकांचं निवेदन…

कामोठे : 8 ऑगस्ट (4K समाचार )”हेल्मेट विसरलं, पण काय त्या एका चुकेसाठी हजारोंचा दंड योग्य आहे का?” हा प्रश्न विचारत आज कामोठ्यातील अनेक सामान्य नागरिकांनी आपल्या वेदना प्रशासनापर्यंत पोहोचवल्या.


कामोठे सेक्टर १९/२० येथील विस्टा कॉर्नर चौकात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून, मागील काही काळात हेल्मेट न वापरणे किंवा किरकोळ वाहतूक नियम उल्लंघन केल्याच्या कारणावरून हजारोंच्या संख्येने दंड लावण्यात आले. या अवाजवी कारवाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर निघालं की भीती वाटते — कॅमेरा दिसला की काळजाचा ठोका चुकतो.
“सुरक्षिततेसाठी कॅमेरे लावा, पण आम्हाला गुन्हेगार ठरवू नका,” असं म्हणत आज कामोठ्याच्या रहिवाशांनी कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. अजय भोसले आणि ट्रॅफिक हवालदार पाटील साहेब यांची भेट घेतली. या भेटीत विस्तृत चर्चा करत नागरिकांना सवलत द्यावी, अशी मागणी त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली.



ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांचे पालक, नोकरदार वर्ग… सर्वसामान्यांच्या तोंडून आज एकच आवाज होता – “आम्ही कायद्याचे पालन करू, पण अन्यायकारक दंड नको!”

यावेळी वरिष्ठ निरीक्षक श्री. अजय भोसले यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिलं. त्यांनी सांगितलं की, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून लावल्या जाणाऱ्या दंडामध्ये कामोठेतील स्थानिक नागरिकांना लवकरच सवलत देण्याचा विचार केला जाईल.
या ऐक्य आणि न्याय्य मागणीच्या लढ्यात सहभागी असलेले रहिवासी होते – श्री. सुनील करपे, अ‍ॅड. समाधान काशीद, श्री. सुरेश खरात, श्री. दत्तात्रय निकम, श्री. रंगनाथ कोरडे, श्री. बापू साळुंखे, श्री. तानाजी कोनुरे, श्री. निलेश चिकणे, श्री. तात्या घाडगे, श्री. तनवीर डफेदार, आणि श्री. रोहित तांबे उपस्थित होते.
कामोठ्याच्या रस्त्यावरचा हा लढा हेल्मेटविरुद्ध नाही, तर अन्यायाविरुद्ध आहे – प्रशासनाकडून न्याय मिळेल, या आशेवर आज सारे उभे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top