नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; ठाण्यासह 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट

4k समाचार दि. 20

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने आज ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, पालघर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. 



मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे, नाले तुडुंब भरून वाहण्याची तसेच काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक बाहेर न पडण्याचे आवाहन केले असून, धोकादायक भाग टाळण्याचे निर्देश दिले आहेत.



दरवर्षीप्रमाणे कोकणपट्टी आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीचे संकट ओढवण्याची शक्यता असल्याने बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top