4k सामाचार दि. 22
नवी मुंबई | शिरवणे गाव आणि परिसरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून (महावितरण) जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवले जात असल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मोठा मोर्चा काढला. डॉ. राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरवणे गावातील नागरिक व विविध संघटना मिळून नेरुळ येथील एमएसईबी कार्यालयावर धडकले.
या वेळी “स्मार्ट मीटर हटवा, जनतेला वाचवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात अनावश्यक वाढ होत असून नागरिकांवर आर्थिक भार टाकला जात आहे. याविरोधात अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

मोर्चादरम्यान नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले. जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया थांबवून लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

