नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

पुढील वर्षी होणार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सुप्रीम कोर्टाने दिली 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली: (4Kसमाचार)गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढील वर्षीच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या मुदतवाढीच्या मागणीला न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

ओबीसी आरक्षणासह अनेक कारणांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांना दिलेली स्थगिती उठवल्यानंतर मे महिन्यात न्यायालयाने निवडणूक आयोगाला चार महिन्यांच्या आत, म्हणजेच ऑक्टोबर 2025 पर्यंत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, आयोगाने प्रभाग पुनर्रचना, आरक्षण आणि मतदार याद्या तयार करण्याची कामे सुरू केली होती.

मात्र, ईव्हीएमची उपलब्धता, सण-उत्सव आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यांसारखी कारणे राज्याकडून सादर करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या मागणीवर आज, मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिलासा देत 31 जानेवारी 2026 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे.

​या निर्णयामुळे राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढील वर्षीच होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने दिलेली ही अंतिम मुदत असल्यामुळे निवडणूक आयोगाला या कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करून निवडणुका घेणे बंधनकारक असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top