नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पुढील वर्षी होणार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सुप्रीम कोर्टाने दिली 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली: (4Kसमाचार)गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढील वर्षीच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या मुदतवाढीच्या मागणीला न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

ओबीसी आरक्षणासह अनेक कारणांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांना दिलेली स्थगिती उठवल्यानंतर मे महिन्यात न्यायालयाने निवडणूक आयोगाला चार महिन्यांच्या आत, म्हणजेच ऑक्टोबर 2025 पर्यंत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, आयोगाने प्रभाग पुनर्रचना, आरक्षण आणि मतदार याद्या तयार करण्याची कामे सुरू केली होती.

मात्र, ईव्हीएमची उपलब्धता, सण-उत्सव आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यांसारखी कारणे राज्याकडून सादर करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या मागणीवर आज, मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिलासा देत 31 जानेवारी 2026 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे.

​या निर्णयामुळे राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढील वर्षीच होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने दिलेली ही अंतिम मुदत असल्यामुळे निवडणूक आयोगाला या कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करून निवडणुका घेणे बंधनकारक असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top