नवीन बातम्या
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार
कळंबोली बस स्थानकातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे महिलेची सोन्याची बॅग परत

आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर


पनवेल दि. (13) वार्ताहर : यापुढे येणारी परिस्थिती अत्यंत कठीण होत जाणार असून पनवेलमध्ये स्थानिकांबरोबर मोठ्या प्रमाणात बाहेरील व्यक्ती व व्यापारी येथे येणार आहेत. त्यामुळे आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर यांनी लाईनआळीयेथील शिवाजी क्रीडा युवक मंडळाच्या महापूजा निमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले.  


यावेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शन भोईर, दीपक शेट्ये, सुधीर सावंत, जतीन भेंडे, शिवराज साखरे, राजेंद्र साखरे, विकास म्हात्रे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना रमेश गुडेकर यांनी सांगितले कि लाईनआळी येथील शिवशक्ती मित्र मंडळ,  शिवाजी क्रीडा युवक मंडळ व एकता मित्र मंडळ हि मंडळे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. हा विभाग माझा आहे. 

ह्या विभागाने मला बाप बनवले आहे. त्याला मी कधीही विसरणार नाही ह्या विभागातील कदम परिवार, चव्हाण परिवार, नरसाळे परिवार ह्या सर्व परिवारांनी मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. प्रत्येक संघर्षामध्ये त्यांनी माझे संरक्षण केल्याने मी त्यांचे जास्तीत जास्त देणे लागत आहे. व मी हे माझे कर्तव्य समजतो. त्यामुळे आपापसातील मतभेद विसरून सर्वानी एकत्र यावे असे आवाहन गुडेकर यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top