नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

रस्ते, लाईट, आरोग्यसेवा – कामोठेकर त्रस्त, सागर भाऊ पाटील प्रतिष्ठानचा पालिकेला इशारा

पनवेल :सप्टेंबर 9 (4K समाचार)कामोठे परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी व सोयीसुविधांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सागर भाऊ पाटील प्रतिष्ठान, कामोठे तर्फे आज पनवेल महानगरपालिकेत महत्त्वाचे मागणीपत्र सादर करण्यात आले. या मागणीपत्रात नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षा व सुविधा यांच्याशी संबंधित अनेक तातडीच्या विषयांचा समावेश आहे.



📌 प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :

कामोठे सेक्टर २१ येथील चौकाचे नामकरण “लोकनेते दि. बा. पाटील चौक” असे करणे.
कामोठे सेक्टर १० मधील विक्रम कॉम्प्लेक्स (ग्लोबल मेडिकल) ते स्मशानभूमी दरम्यानचा रस्ता त्वरित दुरुस्त करणे.
सेक्टर १० व परिसरातील रस्त्यांवर नवीन स्ट्रीट लाईट बसविणे व बंद पडलेले लाईट सुरू करणे.
ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी घरपोच आरोग्यसेवा सुरू करणे.
रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलांची नियमित आरोग्य तपासणी करणे.
स्मशानभूमीतील चिमणी त्वरित कार्यान्वित करणे




सदर मागण्या नागरिकांच्या सोयी, आरोग्य, सुरक्षितता आणि जीवनमान उंचावण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे प्रतिष्ठानने स्पष्ट केले. कामोठे व परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन या सुविधा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी असल्याचेही नमूद करण्यात आले.

🗣️ अध्यक्ष सागर दिलीप पाटील म्हणाले :
“कामोठे परिसरातील नागरिकांच्या अडचणी दीर्घकाळ प्रलंबित आहेत. नागरिकांच्या सोयी, सुरक्षितता आणि आरोग्याशी निगडित प्रश्न तातडीने मार्गी लागणे आवश्यक आहे. या मागण्या पूर्ण झाल्यास कामोठेतील नागरिकांचे जीवनमान उंचावेल. महानगरपालिका व संबंधित विभागांनी सकारात्मक दृष्टीकोनातून त्वरित पावले उचलावीत, अशी आमची अपेक्षा आहे.”
सागर भाऊ पाटील प्रतिष्ठानने विश्वास व्यक्त केला आहे की प्रशासन व स्थानिक जनप्रतिनिधी यांच्या सहकार्याने या मागण्या लवकरच मार्गी लागतील आणि नागरिकांना दिलासा मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top