नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

उरण महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण संपन्न



4 k समाचार 
उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने उरण रेल्वे स्टेशन परिसर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. ‘हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र’ या महाराष्ट्र शासनाच्या दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या निर्देशान्वे महाविद्यालयातीच्या वतीने हा उपक्रम राबवला गेला. 

महाविद्यालयाचे प्रा. डॉ. वाल्मीक गर्जे, स्टेशन व्यवस्थापक मा. जगदीश जाधव, रेल्वे सुरक्षा  विभागातील ए एस आय आकाश खोब्रागडे,हेडकॉन्स्टेबल कृष्णा सिंग,हेड कॉन्स्टेबल रानसिंह मीना, आय क्यू ए सी समन्वयक डॉ. ए. आर. चव्हाण, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. एच. के. जगताप, इतिहास विभाग प्रमुख डॉ. एम.जी. लोणे, प्रा. अनुपमा कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विनिता तांडेल, डॉ. दत्ता हिंगमिरे आदींच्या उपस्थितीत विविध वृक्ष लावण्यात आली. यावेळी एकूण १२० वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण रक्षण व संवर्धन ही काळाची गरज असल्याचा संदेश समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला गेला. या वृक्षारोपण मोहिमेत विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला व  वृक्षारोपण यशस्वी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top