नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विनोबा भावे यांना अभिवादन!




4k समाचार
उरण दि  12 (विठ्ठल ममताबादे )भूदान चळवळीचे प्रणेते आणि भूदान चळवळीद्वारे भूमिहीनांना जमिनी देणारे, ‘भारतरत्न’ विनोबा भावे यांची जयंती गुरुवारी (ता. ११)  पेण येथील त्यांच्या जन्मगावी
गागोदे बुद्रुक येथे साजरी करण्यात आली. यावेळी कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी विनोबा भावे यांना अभिवादन केले.



यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, ”विनोबा भावे महान होते. त्यांनी जगाला आदर्शवत अशी भूदान चळवळ राबवली. ज्यांना जमिनी नाहीत त्यांना विनोबा भावे यांनी सावकारांकडून जमिनी घेऊन त्या भूमिहीनांना दान केल्या. त्यांची ही भूमिका जगावेगळी आहे. विनोबा भावे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श मी घेतला. आपल्या ताटातील अर्धी भाकरी  दुसऱ्याला देण्याचा. त्यामुळेच स्वत:च्या कमाईतील ४० टक्के कमाई गोरगरिबांवर मी खर्च करतोय. अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शिक्षण आणि नोकरीही दिली. गरिबांच्या घरांना मदत, अनेकांना घरे, गाड्या दिल्यात. हीच दातृत्वाची भावना घेऊन यापुढेही असेच आयुष्य जगणार आहे. ”



“गरिबीमुळेच मी राजकारणात आलो. त्यामुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला. शेलघर हे आदर्श गाव बनवले. काम करण्याचा उद्देश चांगला असेल तर निश्चितच यश मिळते. ‘जनसेवेसी काया झिजवावी’, या उक्तीप्रमाणे सामाजिक संस्थांच्या मी कायम मागे आहे. विनोबांच्या स्मृती कायम राहण्यासाठी त्यांच्या नावाने स्वागत कमान उभारली जाईल. खर्चाची जबाबदारी मी घेतो,” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यावेळी म्हणाले.
यावेळी  सर्वोदय चळवळीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब नेने, शिवाजीदादा कागणीकर,  डॉ. श्रीराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर, वैभव पाटील, मार्तंड नाखवा आणि सर्वोदय चळवळीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top