नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

Category: महाराष्ट्र

हैदराबाद गॅझेटमुळे आदिवासींच्या हक्कांवर गदा; उल गुलाल आंदोलनाची सुरुवात

4k समाचार दि. 15 नवी मुंबई – हैदराबाद गॅझेटमुळे आदिवासी समाजाच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने शहापूर येथून उल गुलाल आंदोलनाची सुरुवात केली आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून हजारो आदिवासी बांधव त्यात सहभागी झाले आहेत. आंदोलनाची पुढील टप्पा मंत्रालयापर्यंत नेण्याची तयारी सुरू आहे.  राष्ट्रीय अध्यक्ष लकीव […]

शिरूर, आंबेगाव, मुळशी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस; शेती, रस्ते पाण्याखाली

4k समाचार पुणे, दि. 15 – पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव आणि मुळशी तालुक्याला काल रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस होऊन शेतीचे बांध तुटले असून ओढे-तळे तुडुंब भरून पाणी सांडव्यावरून वाहत आहे.  शेत रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, खाडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात १४,५०० क्युसेक्स इतक्या विसर्गाला सुरुवात करण्यात […]

औंढा नागनाथात ओबीसींचा रास्तारोको; हिंगोली-परभणी महामार्ग ठप्प

4k समाचार दि. 10 हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी हिंगोली–परभणी महामार्ग रोखून प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाला बाळा नांदगावकर यांसह ओबीसी समाजाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  रास्तारोकोदरम्यान वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. आंदोलनानंतर पुढील आंदोलनाची दिशा […]

सौ. आशाराणी बनगर यांना अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मान – देशसेवेत उज्वल कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलेला गौरव

4k समाचार दि. 10 वीरकरवाडी, ता. माण / घाणंद, ता. आटपाडी.देशसेवेत स्वतःला झोकून देत अनेक अडथळ्यांवर मात करून आदर्श निर्माण करणाऱ्या सौ. आशाराणी शंकर बनगर यांना अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या समर्पित सेवेला मानाचा मुजरा करण्यात आला..     वीरकरवाडी, ता. माण येथील रहिवासी असलेल्या आशाराणी बनगर […]

जीआरमध्ये फसवणूक झाली तर राज्यात मंत्री फिरु देणार नाहीत – जरांगे

पनवेल दि. २ (प्रतिनिधी)  4k समाचार मराठा समाजाला कुणबी म्हणून नोंद मिळावी यासाठी मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा आज एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्य सरकारला अखेर निर्णय घ्यावा लागला असून, हैद्राबाद गॅझेटनुसार गावातील, नात्यातील आणि कुळातील सखोल तपासणी करून पात्रांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास मान्यता देण्यात आली […]

जरांगेंना धक्का; गॅझेटची मागणी निरर्थक, शिंदे समितीनेच केली पोलखोल

4k समाचार दि. 28 मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. यासाठी त्यांनी हैद्राबाद गॅझेट, मुंबई गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी निरर्थक असल्याचं स्पष्ट झालं आहे.  मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या माजी न्या. संदीप शिंदे समितीने याबाबत अभ्यास करून निष्कर्ष काढला आहे. या तिन्ही […]



मनोज जरांगेंनी रणनीती बदलली; मराठा मोर्चा 7 टप्प्यांत राज्यभर उभारणार

4k समाचार दि. 28 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने सरकारवर दबाव टाकणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता रणनीतीत बदल करत हे आंदोलन राज्यभर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार, 29 ऑगस्टपासून सात टप्प्यांत संपूर्ण महाराष्ट्रभर हा मोर्चा उभारला जाणार आहे. आतापर्यंत मुंबईपुरते मर्यादित असलेले हे आंदोलन […]

जरांगेंच्या मोर्चादरम्यान हृदयविकाराने सहकाऱ्याचा अंत

4k समाचार दि. 28 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चादरम्यान मोठी घटना घडली आहे. अंतरवाली सराटी येथून निघालेला मोर्चा आज सकाळी जुन्नरमध्ये दाखल झाला असता, जरांगेंच्या एका सहकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे मोर्चात एकच खळबळ उडाली.  याआधी मोर्चा निघण्यापूर्वी लातूरमध्ये मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या […]

माजलगावातून 1200 गाड्यांसह जरांगे आंदोलनाला भव्य पाठिंबा

4k समाचार  दि. 27 बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यातील विविध गावांतून तब्बल 1200 गाड्या अंतरवेलीच्या दिशेने रवाना झाल्या असून, हजारो मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत. समाज बांधवांनी वर्गणी करून गाड्यांची तसेच पंधरा दिवस पुरेल अशी जेवणाची सोय केली आहे. या उत्स्फूर्त सहभागामुळे […]

राज्यात पावसाचा इशारा; कोकणात जोरदार सरींची शक्यता

4k समाचार दि. 25मुंबई | महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात सध्या ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असला तरी आज (२५ ऑगस्ट) कोकण विभागात जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, लातूर […]

Back To Top