4k समाचार दि. 28 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने सरकारवर दबाव टाकणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता रणनीतीत बदल करत हे आंदोलन राज्यभर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 29 ऑगस्टपासून सात टप्प्यांत संपूर्ण महाराष्ट्रभर हा मोर्चा उभारला जाणार आहे. आतापर्यंत मुंबईपुरते मर्यादित असलेले हे आंदोलन […]
मायाक्का मंदिर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानातील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्थेबाबत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष आक्रमक
4k समाचार पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : कामोठे वसाहतीतील सेक्टर 35 येथील मायाक्का मंदिर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानातील सार्वजनिक शौचालयाच्या दुरावस्थेबाबत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष आक्रमक झाला असून तातडीने पनवेल महानगरपालिकेने आवश्यक सुधारणा कराव्यात अशी मागणी शिवसेने कडून करण्यात आली आहे . या संदर्भात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे […]
जरांगे पाटलांचा मराठा मोर्चा मुंबईकडे; पोलिसांकडून ४० अटींसह परवानगी
मुंबई : 4k समाचार दि. 27 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाची आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात मोर्चाचा मुक्काम जुन्नर येथे होणार असून २८ ऑगस्ट रोजी हा मोर्चा आझाद मैदान, मुंबई येथे पोहोचणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांपूर्वीच पूर्वपरवानगीशिवाय आंदोलनास बंदी घातली होती. मात्र, जरांगे […]
ठाकरे बंधूंचे गणेशोत्सवात मनोमिलन
4k समाचार 27 मुंबई गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा प्रसंग घडला. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आज पुन्हा एकत्र आले. उद्धव ठाकरे कुटुंबासह शिवतीर्थ येथे जाऊन राज ठाकरे यांच्या दीड दिवसांच्या गणपतीचे दर्शन घेतले आणि जेवणाचाही मान स्वीकारला. यापूर्वीच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’वर जाऊन […]
गेवराईत आरक्षण वाद पेटला : लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक, कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष
4k समाचार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या “चलो मुंबई” च्या हाकेला विरोध करण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर गेवराई येथे हाके यांच्या कार्यकर्ते आणि विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री उडाली. या संघर्षादरम्यान लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात […]
राज्यात पावसाचा इशारा; कोकणात जोरदार सरींची शक्यता
4k समाचार दि. 25मुंबई | महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात सध्या ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असला तरी आज (२५ ऑगस्ट) कोकण विभागात जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, लातूर […]
राज ठाकरे – फडणवीसांची 50 मिनिटांची बैठक; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण
4k समाचार मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. ही बैठक तब्बल 50 मिनिटे चालली. बैठकीत राज्यातील नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत असली तरी या भेटीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे काही वेळातच पत्रकार परिषद घेणार असल्याने त्यांच्या […]
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सज्जता; गरजेच्या ठिकाणी आपत्ती प्रतिसाद दलाची पथके त्वरित पाठवण्याच्या सूचना
4k समाचार दि. 21 मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती, वाहतुकीतील अडथळे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीदरम्यान पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेण्यात आली. पूरस्थिती नियंत्रण, नागरिकांची […]
खड्डेमय रस्त्यांवर टोल आकारता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
4k समाचार दि. 21 सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील वाहनचालकांना मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निकाल दिला आहे. खड्डेमय आणि वाहतूक कोंडी असलेल्या रस्त्यांवर प्रवाशांकडून टोल वसूल करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. केरळ उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या खंडपीठाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि कंत्राटदारांची याचिका फेटाळली. “निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांसाठी […]
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; ठाण्यासह 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट
4k समाचार दि. 20 मुंबई | राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने आज ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, पालघर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे, नाले तुडुंब भरून […]