काही महिन्यांपूर्वी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निर्दोष पर्यटकांना प्राण गमवावे लागले. त्या रक्तरंजित घटनेने संपूर्ण देश हादरला. भारतीय सेनेने धाडसी कारवाया करून दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्या जखमा आजही ताज्याच आहेत. शहिदांच्या बलिदानाची सावली अजूनही जनमानसावर आहे. अशा वेळी भारत–पाक क्रिकेट सामना खेळवण्यास परवानगी देणे हे भारतीयांच्या भावना पायदळी तुडवण्यासारखे आहे. सरकारने […]
महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय – श्री गुरु तेग बहादुर साहिब जींच्या ३५०व्या शहादत शताब्दी व श्री गुरु गोबिंद सिंह जींच्या ३५०व्या गुरता गादी शताब्दी राज्य स्तरावर साजरी करण्यात येणार
4k समाचार मुंबई: दिनांक: १३ सप्टेंबर २०२५महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक व मैलाचा दगड ठरणारा निर्णय घेत १२ सप्टेंबर २०२५ रोजी अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या GR नुसार खालील दोन महान गुरुपर्व राज्य स्तरावर भव्य पद्धतीने साजरे केले जाणार आहेत – • “हिंद दी चादर – श्री गुरु तेग बहादुर साहिब जींची ३५०वी […]
जीआरमध्ये फसवणूक झाली तर राज्यात मंत्री फिरु देणार नाहीत – जरांगे
पनवेल दि. २ (प्रतिनिधी) 4k समाचार मराठा समाजाला कुणबी म्हणून नोंद मिळावी यासाठी मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा आज एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्य सरकारला अखेर निर्णय घ्यावा लागला असून, हैद्राबाद गॅझेटनुसार गावातील, नात्यातील आणि कुळातील सखोल तपासणी करून पात्रांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास मान्यता देण्यात आली […]
मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु; बीडमध्ये कार्यवाहीला प्रारंभ
4k समाचार दि. 2 मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण आज पाचव्या दिवशी पोहोचले असून, त्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एकावर सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. मराठा आंदोलक तरुणांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची मागे घेण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरु झाली आहे.. बीड जिल्ह्यात या संदर्भातील कार्यवाहीला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून आरक्षण आंदोलनातील […]
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यावर सदावर्तेचा आक्षेप; सरकारला न्यायालयीन लढाईचा इशारा
4k समाचार दि. 2 मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतर नवे वादंग उभे राहिले आहे. प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या निर्णयाला तीव्र आक्षेप नोंदवला आहे. सदावर्ते यांनी स्पष्ट केले की, आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे गुन्हे मागे घेणे कायद्याच्या चौकटीत शक्यच नाही. असे गुन्हे मागे घेण्याचा सरकारने […]
मनोज जरांगेंनी रणनीती बदलली; मराठा मोर्चा 7 टप्प्यांत राज्यभर उभारणार
4k समाचार दि. 28 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने सरकारवर दबाव टाकणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता रणनीतीत बदल करत हे आंदोलन राज्यभर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 29 ऑगस्टपासून सात टप्प्यांत संपूर्ण महाराष्ट्रभर हा मोर्चा उभारला जाणार आहे. आतापर्यंत मुंबईपुरते मर्यादित असलेले हे आंदोलन […]
मायाक्का मंदिर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानातील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्थेबाबत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष आक्रमक
4k समाचार पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : कामोठे वसाहतीतील सेक्टर 35 येथील मायाक्का मंदिर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानातील सार्वजनिक शौचालयाच्या दुरावस्थेबाबत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष आक्रमक झाला असून तातडीने पनवेल महानगरपालिकेने आवश्यक सुधारणा कराव्यात अशी मागणी शिवसेने कडून करण्यात आली आहे . या संदर्भात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे […]
जरांगे पाटलांचा मराठा मोर्चा मुंबईकडे; पोलिसांकडून ४० अटींसह परवानगी
मुंबई : 4k समाचार दि. 27 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाची आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात मोर्चाचा मुक्काम जुन्नर येथे होणार असून २८ ऑगस्ट रोजी हा मोर्चा आझाद मैदान, मुंबई येथे पोहोचणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांपूर्वीच पूर्वपरवानगीशिवाय आंदोलनास बंदी घातली होती. मात्र, जरांगे […]
ठाकरे बंधूंचे गणेशोत्सवात मनोमिलन
4k समाचार 27 मुंबई गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा प्रसंग घडला. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आज पुन्हा एकत्र आले. उद्धव ठाकरे कुटुंबासह शिवतीर्थ येथे जाऊन राज ठाकरे यांच्या दीड दिवसांच्या गणपतीचे दर्शन घेतले आणि जेवणाचाही मान स्वीकारला. यापूर्वीच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’वर जाऊन […]
गेवराईत आरक्षण वाद पेटला : लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक, कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष
4k समाचार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या “चलो मुंबई” च्या हाकेला विरोध करण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर गेवराई येथे हाके यांच्या कार्यकर्ते आणि विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री उडाली. या संघर्षादरम्यान लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात […]
